ज्याला भू’तबंगला म्हणून ओळखले जायचे तोच बंगला खरेदी करून राजेश खन्ना यांचे बदलले नशीब, पहा मात्र ‘इतक्या’ रुपयात केला होता खरेदी…

सुपरस्टार राजेश खन्ना यांचा मुंबईच्या कार्टर रोडवरील बंगला आशीर्वाद त्या काळात खूप लोकप्रिय होता. असे म्हणतात की या बंगल्याला पूर्वी लोक भू’तबंगला म्हणत असत. सुपरस्टार राजेश खन्ना या बंगल्याचे मालक कसे झाले आणि या बंगल्यात आल्यानंतर त्यांना काय काय अनुभव आले? चला याबद्दल जाणून घेऊया.
ही कहाणी १९६० च्या दशकापासून सुरू होते, त्यावेळी मुंबईच्या कार्टर रोडवर फारच कमी बंगले असायचे. त्यावेळी नौ’शाद साहबने इथे ‘आशियाना’ नावाचा बंगला घेतला होता. नौशाद साहेबांच्या बंगल्याजवळच एक दोन मजली बंगला होता ज्याला लोक भू’तबंगला म्हणायचे.
असे म्हणतात की राजेंद्र कुमार यांनी हा बंगला 60 हजारात विकत घेतला आणि त्यास डिंपल असे नाव दिले. हा बंगला बदलताच जणू काही राजेंद्रकुमारचे नशिबच चमकले आणि ते एका रात्रीत सुपरस्टार झाले. त्यांचे चित्रपट अनेक आठवडे चालत असत, ज्यामुळे त्यांना ज्युबली कुमार हे नाव पडले. राजेंद्र कुमार खूप प्रसिद्ध झाले आणि त्यांनी मुंबईतील पाली हिल्स येथे आणखी एक बंगला बांधला, त्याला सुद्धा त्यांनी डिंपल असेच नाव दिले.
तोपर्यंत राजेश खन्ना इंडस्ट्रीत नवीन आले होते आणि ते इंडस्ट्रीचा पुढील सुपरस्टार होण्याच्या मार्गावर होते. त्या काळात राजेश खन्ना यांना कळले की राजेंद्र कुमार यांना आपला कार्टर रोड बंगला विकायचा आहे आणि तो यासाठी योग्य ग्राहक शोधत आहेत.
या बंगल्यात येताच राजेंद्रकुमार यांचे नशीब कसे चमकले आणि कसा चमत्कार झाला याबद्दल राजेश खन्ना यांनी ऐकले होते त्यांना देखील यावर विश्वास होता. अशा परिस्थितीत राजेश खन्ना यांना वाटलं की त्यांनीही हे घर विकत घेतले तर त्यांचे नशीब देखील बदलेल.
मिडियाच्या बातमीनुसार हा बंगला राजेंद्र कुमार यांनी बर्याच सन्मानानंतर राजेश खन्ना यांना साडेतीन लाखांना विकला होता. या बंगल्याला पुढे ‘आशीर्वाद’ असे नवे नाव पडले आणि त्यानंतर ते खरोखरच एका चमत्काराप्रमाणे झाले.
या बंगल्यात आल्यानंतर राजेश खन्ना हे भारताचे पहिले मोठे सुपरस्टार झाले आणि त्यांची लोकप्रियता इतकी वाढली की लोक ‘काका’ म्हणू लागले. या घरातून राजेश खन्नाने इतके यश पाहिले होते जे आजपर्यंत कोणत्याही सुपरस्टारला पाहता आलेले नाही.
पण, पुन्हा वेळ फिरली आणि इंडस्ट्रीमध्ये अशा स्टारची इंट्री झाली ज्याची 8 चित्रपट बॅक टू बॅक फ्लॉप झाले होते. होय, आम्ही बोलत आहोत अमिताभ बच्चनबद्दल ज्यांना ‘जंजीर’ चित्रपटातून सुपरस्टारकॅ दर्जा मिळाला आणि हळूहळू काकांचे करीयर संपू लागले.
नंतर, जिथे अमिताभ नवीन सुपरस्टार झाले होते, तिथे राजेश खन्ना यांचे चित्रपट फ्लॉप होत होते. एक काळ असा होता की राजेश खन्ना यांच्या या घराच्या बाहेर डायरेक्टर आणि निर्मात्यांची रंग लागली असायची आता मात्र घरात कधी तर एक डायरेक्टर भेटायला येवू लागला.
आशीर्वाद या बंगल्या मध्ये जीवन जगतानाच हे सर्व घडले आणि ते म्हणतात की येथूनच राजेश खन्ना यांना असा आ’जार झाला की ते पुन्हा कधीही यातून बरे होऊ शकले नाहीत. राजेश खन्नाचा हा बंगला आता विकला गेला आहे आणि मीडिया रिपोर्टनुसार तोडल्यानंतर इतर कोणताही प्रकल्प इथल्या बिल्डरकडून बांधला गेला नाही.