म्हणून सलमानने सुभाष घई यांच्या कानाखाली लगावली होती थप्पड, म्हणाला त्यांनी एका रात्री ऐश्वर्याला त्यांचे बंगल्यावर…..

राज कपूर यांना बॉलिवूड फार पूर्वीपासून शोमन असे म्हणत आलेले आहे. याचे कारण म्हणजे राज कपूर हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. ते दिग्दर्शक, अभिनय, संगीत आणि इतर सर्व काही करायचे. त्यानंतर ही पदवी सुभाष घई यांना मिळाली. सुभाष घई यांना शो मन म्हणून आजही ओळखले जाते. मात्र, गेल्या काही कालावधीपासून त्यांचे चित्रपट येणे बंद झाले आहे.
सुभाष घई यांनी आजवर अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. तसेच त्यांचे अनेक चित्रपट तुफान गाजलेले देखील आहेत. ताल हा चित्रपट त्यांचा खूप चालला होता. या चित्रपटामध्ये ऐश्वर्या राय हिने चार चाँद लावले होते. तसेच अनिल कपूर याने देखील चांगले काम केले होते. यापूर्वी सुभाष यांनी हिरो, खलनायक या सारखे दर्जेदार चित्रपट बॉलिवूड ला दिले होते. अनेक अभिनेत्रींचे त्यांनी करिअर देखील केले होते.
याआधीचे संगीता, बिजलानी, सोमी आली या अभिनेत्रीसोबत त्याचे प्रेम प्रकरण गाजले होते. सलमान खान याने ऐश्वर्या रायला दारूच्या नशे त अनेकदा मारहाण देखील केली होती. त्यानंतर विवेक ओबेराय याला देखील त्याने शिवीगाळ करून धमकी दिली होती. विवेक याने पत्रकार परिषद घेऊन जाहीर आपबिती सांगितली होती. प्रकरण असे झाले होते की, ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांचे प्रेमप्रकरण सुरू होते.
त्यावेळेस सलमान खान याचे करिअर देखील स्थिरस्थावर होते. तसेच त्याला ऐश्वर्या राय हिला बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्री बनवायचे होते. त्यामुळे एका पार्टी त सलमान खान यांची भेट सुभाष यांच्यासोबत झाली होती. त्यावेळी सलमान खान याने ऐश्वर्याचा विषय काढला आणि आगामी चित्रपटातील घेण्याची विनंती केली. त्यावर सुभाष घई यांनी सलमानला सांगितले की, ऐश्वर्या माझ्या बंगल्यावर पाठवून दे.
त्यावर सलमान खान हा अतिशय चिडला आणि त्याने सुभाष घई यांच्या कानाखाली लगावली. याचे कारण म्हणजे सुभाष घई यांचा हा बंगला रंगेल कामासाठी त्यावेळी चर्चेत होता. त्यामुळे सलमान खानला याबाबत माहिती होते. त्यामुळे त्याने घई यांना कानाखाली लगावली. या प्रकरणानंतर सलमानचे वडील सलीम खान यांनी सुभाष घई यांची माफी मागितली.
याबाबत शक्ती कपूर याने एका स्टिंग ऑपरेशन मध्ये यावर खुलासा देखील केला होता. तसेच ऐश्वर्याही ब्रेन विथ ब्युटी म्हणून गणली जाते. त्यामुळे तिने नेमके काय केले होते, हे तिलाच माहिती. हा भाग वेगळा आहे की, या प्रकरणानंतर सुभाष घई यांनी ऐश्वर्या हिला त्यांच्या ताल चित्रपटात घेतले होते. हा चित्रपट प्रचंड चालला होता.