45 व्या वर्षी शिल्पा शेट्टीने मुलीला जन्म दिल्यामुळे लोकांनी केल्या नालायक कमेंट, त्यावर शिल्पा म्हणाली माझ्यात हिम्मत होती म्हणून मी….

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी मागच्या काही महिन्यामागेच दुसऱ्यांदा आई बनली आहे. यावेळी तिला एक मुलगी झाली आहे. शिल्पाने इन्स्टाग्रानवर एक फोटो पोस्ट करुन ही आनंदाची बातमी दिली होती. या फोटोमध्ये शिल्पाची मुलगी तिचे बोट पकडताना दिसत आहे.
शिल्पाची मुलगी समिशाचा जन्म से-रोगेसीच्या माध्यमातून झाला असला तरी शिल्पा वयाच्या 45 व्या वर्षी सोशल मीडियावर बर्याचदा आई बनण्याविषयी बर्याच गोष्टी शेअर करत असते. यावर्षी फेब्रुवारीमध्ये शिल्पा शेट्टी एका मुलीची आई झाली आहे.
पुढे बोलतांना शिल्पा म्हणाली की माझ्यात हिम्मत आहे म्हणून मी वयाच्या 45 व्या वर्षी दुसर्या मुलाची आई बनली आहे. शिल्पा पुढे म्हणाली की जेव्हा मी 50 वर्षांची होईल तेव्हा समीषा ही 5 वर्षांची होईल. मी इतरांच्या गोष्टींकडे जास्त लक्ष देत नाही.
शिल्पा असेही म्हणाली की ती आई म्हणून जे काही करू शकते, ते सर्वकाही ती आपल्या दोन्ही मुलांसाठी करत असते. ती नेहमीच त्यांना सर्वोत्तम देते. एका मुलाखतीदरम्यान शिल्पाने सांगितले होते की वियान आता थोडा मोठा झाल्याने बर्याच दिवसांपासून ती दुसर्या मुलासाठी योजना आखत होती.
पण मी नेहमी अपयशी ठरत होते. मला रोगप्रतिकारक प्रणालीशी निगडीत एक आजार झाला होता. ज्या आजाराने माझ्या गरोदरपणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. यामुळे मला आई बनता येत नव्हते, त्यामुळे माझ्यासाठी ती एक मोठी समस्या झाली होती.
शिल्पा म्हणाली की, मी बाळ दत्तक घेण्याचा विचार केला होता. वियानने त्याचे बालपण एकटे घालवावे अशी माझी इच्छा नव्हती कारण आम्हीसुद्धा दोन बहिणी असून भाऊ किंवा बहीण एकत्र असणे किती आवश्यक आहे हे मला चांगलेच समजले आहे.
याबद्दल विचार करत मी बऱ्याच कल्पनांवर लक्ष केंद्रित केले होते. पण काहीही नीट होत नव्हते. दत्तक देण्याच्या सर्व गोष्टी पूर्ण करूनही, ख्रिश्चन मिशिनरी अचानक थांबली आणि मला मुलाशी जुळवून घेता आले नाही. यासाठी मी चार वर्षे थांबले होतो पण काहीही झाले नाही. मला खूप राग आला आणि मग आम्ही दोघांनी शेवटी सरोगेसीचा मार्ग निवडला.
मध्यंतरी शिल्पा आणि राज यांच्या नात्यात दुरावा आल्याचे बोलले जात होते. गेल्या काही दिवसांपासून राज त्याच्या घरी जात नव्हता. तो मुंबईमधील त्याच्या ऑफिसमध्येच राहत होता. यामुळे शिल्पा आणि राज यांच्यात काही तरी मतभेद झाल्याची चर्चा होती.
पण आता सत्य समोर आले आहे, या दोघांनीच समोर येवून ही बातमी दिली आहे, असे कोणतेही मतभेद आमच्यात नाहीत आणि आम्ही आनंदाने एकमेकांसोबत आयुष्य जगत आहोत असे राज कुंद्राने सांगितले आहे.