‘चाणक्य’ सांगतात या गोष्टी कधीच कोणालाही सांगू नयेत, अन्यथा…

अर्थनाशं मनस्तापं गृहिणीचरितानि च।
नीचवाक्यं चाऽपमानं मतिमान्न प्रकाशयेत्।।
पुरुषाने आपल्या पत्नीच्या स्वभावाशी संबंधित गोष्टी गुपित ठेवाव्यात. पत्नीशी संबंधित कोणतीही चर्चा इतर लोकांसमोर केल्यास भविष्यात भयंकर अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्यता वाढते.
आपण आपल्या मनाचा संताप म्हणजे दुःख कोणासमोरही उघड करू नये. अशा गोष्टीमुळे कोणताही लाभ तर होतच नाही उलट समाजात आपण हास्याचा विषय अवश्य बनतो. असे अनेक लोक आहेत, ज्यांना इतरांचे दुःख पाहून सुख मिळते, म्हणजे लोक फक्त ऐकून घेतात आणि नंतर त्याचा ते फायदा घेतात.
आचार्य सांगतात की, जर तुमच्या जीवनात एखाद्या नीच व्यक्तीमुळे तुम्हाला अपमानित व्हावे लागले असेल तर ती घटना गुपितच ठेवावी. अपमानाशी संबधित घटना समाजात सांगितल्यास आपण हास्याचा विषय बनतो.