लग्न होऊन देखील बाळ नकोय ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला, म्हणाली कधीच नाही बनायचं आईं, हे आहे कारण…

आई होणे ही महिलांसाठी एक आतुरता असते. प्रतेक महिलेला लग्न झाल्यानंतर एका गोष्टीची आतुरता असते ती म्हणजे लवकरात लवकर आई होणे. प्रतेक विवाहित जोडप्याची देखील हीच इच्छा असते. घरात छोट बाळ कधी येईल याची आतुरता सगळ्या कुटुंबालाच असते. अशातच काही कारणामुळे लग्नानंतर बाळ जन्माला नाही आले तर बाळाच्या आतूरतेपोटी डॉक्टर कडे जाऊन इलाज करून का होईना पण महिला बाळाची आई बनतात.
परंतु आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत त्यात या महिला अभिनेत्रीचे मत यापेक्षा उलट आहे. तीला आईं बनायचं नाहीये. हो हे खर आहे की लग्न होऊन देखील निपुत्रिक राहायचं आहे या अभिनेत्रीला. हे ऐकुन नक्कीच धक्का बसेल. कारण अशी कोणतीही महिला नाही की जिला लग्न होऊन देखील आईं बनायचं नाही. आपण ज्या अभिनेत्री बद्धल बोलणार आहोत तीच नाव आहे कविता कौशिक. तर बघुयात काय आहे सर्व प्रकार.
अलीकडेच एका मुलाखती दरम्यान कविता म्हणाली की मी आणि माझे पती यांनी परस्पर संमतीने निर्णय घेतला आहे की आम्ही कधीच आईं बाप होणार नाही. या अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, जर वयाच्या 40 व्या वर्षी ती आई झाली तर जेव्हा तिचे मूल 20 वर्षांचे असेल तेव्हा ती व तिचा नवरा 60 वर्षांचा असेल. अशा परिस्थितीत तिला आपल्या मुलांवर अन्याय करायचा नाही. वृद्ध पालकांच्या सेवेसाठी ती आपल्या मुलांची जवानी आई वडिलांची सेवा करण्यात वाया घालावी अशी त्याची इच्छा नाही.
मुंबईतले धक्के खायला सोडू शकत नाहीत मुलांना :
कविता म्हणाली, “आम्हाला हे जग शांत आणि हलके ठेवायचे आहे आणि आम्ही मुलांना आधीच गर्दी असलेल्या जगात वाढऊ शकत नाही, आणि मुंबई मधील धक्के खायला मुलांना सोडावं अशी आमची इच्छा नाही.” रोनितने लहानपणीच त्याचे पालक गमावले. माझ्या बाबतीतही तेच घडलं अस कविता बोलली. एकुलती एक मुलगी म्हणून माझ्यावर जबाबदारी होती आणि मला माझ्या कुटुंबासाठी भाकरी मिळवण्यासाठी आणि त्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी खूप कष्ट करावे लागले.
कविता म्हणाली, आम्ही मुलांप्रमाणेच जीवनाचा आनंद घेत आहोत. एखाद्या कपल ने कराव्या तितक्या सर्व इच्छा आम्ही पूर्ण करत आहोत. बरेच वेळा मी पतीशी वडिलांप्रमाणे वागते आणि तो माझ्याशी आईप्रमाणे वागतो. आपल्या आयुष्यातील त्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करत आहोत, ज्या आमच्या जवानित करायच्या राहून गेल्या. त्यामुळे आम्हाला मूल व्हावं किंवा असावं याची आम्हाला गरज वाटत नाही.
नवाब शहाबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर 2017 मध्ये जुन्या बॉयफ्रेंड सोबत केले लग्न :
डॉन 2 आणि दिलवाले यासारख्या चित्रपटात दिसलेल्या अभिनेता नवाब शाहसोबत कविता कौशिकचा ब्रेकअप जुलै 2015 मध्ये झाला होता. असे म्हटले जात होते की कविताचे आईं वडील दोघेही वेगळ्याच धर्माचे असल्यामुळे तीचे आणि नवाब यांच्यातील संबंधांना परवानगी देत नव्हते.
नात्यात काही अन्य मतभेदांमुळे दोघांनी वेगळे होणे अधिक चांगले मानले. नवाबापासून ब्रेकअप झाल्यानंतर कविताने आपला जुना मित्र रोनित बिस्वास यांना डेट करण्यास सुरवात केली. दोघांनी 27 जानेवारी 2017 रोजी केदारनाथमधील मंदिरात लग्न केले.