‘या 3’ गोष्टींचा मुलींना ‘लग्नानंतर’ पश्चात्ताप होतो….

प्रत्येक मुलीचे स्वप्न असते की तिचे लग्न खूप थाटामाटात झाले पाहिजे, तिला तिचा स्वप्नातील राजकुमार भेटला पाहिजे. पण हे स्वप्न खूप कमी मुलींचेच पूर्ण होतात. लग्नाच्या काही दिवसानंतर सासरी काही काळानंतर तिला लग्न केल्याबद्दल वाईट वाटते. मुलीला आपल्या आवडीचा जोडीदार मिळाला असला तरीही सासरच्या लोकांबरोबर, एका छताखाली राहिल्यावर दोघांमधील प्रेम हरवले जाते. मग अशावेळी मुलीला आपले लग्ना आधीचे दिवस आठवतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा तीन गोष्टी सांगणार आहोत ज्यांचा मुलींना लग्नानंतर पश्चात्ताप होतो.
लग्नानंतर मुलींचे स्वतंत्र संपते. आई वडिलांच्या घरात ती ज्या मोकळेपणाने वावरते तसे तिला सासरी वावरता येत नाही सासरच्या घरी तिच्यावर नकळत काही निर्बंध लादले जातात त्यामुळे तिचे राहणे कठीण होते. उदाहरणार्थ, आपल्या आवडीचे कपडे घालणे, मित्रांसह फिरणे, किंवा आपल्या आवडीच्या वस्तू खरेदी करणे. हे सगळं करण्यासाठी तिला सासरच्या लोकांची परवानगी हवी असते, एकतर सासरच्या लोकांची बंधने असतात किंवा त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात. अशा परिस्थितीत मुलींना लग्न केल्याचा पश्चाताप होतो.
लग्नाआधी मुलगी आपल्या करिअरची निवड करू शकते. कोणत्याही शहरात जाऊन नोकरी करू शकते. लग्नाआधी मुलींवर घराची आणि मुलांचीही जबाबदारी नसते. लग्नाआधी मुलगी तिच्या करिअरवर लक्ष करू शकते. परंतु, लग्नानंतर तिला करियर करताना बरेच अडचणी येतात. काही सासू सुनेला काम करण्यास परवानगी देत नाहीत.